google-site-verification=2eSrD4IMziwMlHreClZlqgzdjW2z1jaH8fxiTuuiNrU fbq('track', 'ViewContent');
top of page
Chitrotsav banner 1.jpeg

शिवचरित्र चित्रोत्सव 2025 

Art India Foundation Logo - small.png
Khula Aasmaan.png

शिवछत्रपती म्हणजे वैश्विक चारित्र्याचे  महानायक! त्यांनी साधलेल्या स्वराज्यलढ्याच्या महासंग्रामात अनेक प्रसंग कमालीचे प्रेरणादायी आहेत. काही सर्वश्रुत आहेत तर काही अजूनही म्हणावे तितके प्रकाशझोतात आलेले नाही. आम्ही 'मावळा' आणि 'खुला आसमान' वतीने शिवचरित्रातील फारशा ऐकल्या न गेलेल्या भन्नाट शौर्यगाथांना प्रकाश झोतात आणण्याचा उद्देशाने एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करत आहोत.

आपल्या मधल्या चित्रकाराला आव्हान देत चला साकारू एक आगळावेगळा चित्रोत्सव.. शिवचरित्र चित्रोत्सव.

शिवछत्रपतींसाठी लढलेल्या स्वॉरियर्सच्या म्हणजे स्वराज्ययोद्धयांच्या आयुष्यातील काही प्रसंगांच्या गोष्टी जर त्यांनी स्वतः आपल्याला सांगितल्या तर ते त्या कशा सांगतील? या विचारांतून आम्ही काही  SWARRIORS' STORIES आपणापुढे आणत आहोत. त्यातील तुम्हाला आवडेल त्या गोष्टीला मध्यवर्ती मानून आपण एक कल्पनाचित्र साकारायचे आहे.

श्राव्य स्वरूपात भिडणाऱ्या गोष्टी प्रत्येकाच्या मनात अगदी निरनिराळ्या पद्धतीने अवतरत असतात. नेमक्या त्याच आपण साऱ्यांनी कागदावर उतरवल्या तर यंदाच्या शिवजन्मोत्सवादिवशी आपल्या साऱ्यांच्या मनांतुन साकारले गेलेले एक आगळे वेगळे शिवचरित्र या चित्रोत्सवातून साधायचा आमचा मानस आहे.

शिवछत्रपतींचे स्मरण करून त्यांच्यासाठी लढलेल्या आपल्या अस्सल भारतीय सुपरहिरोजच्या - स्वॉरियर्सच्या - म्हणजे अहो आपल्या स्वराज्ययोद्धांच्या शौर्यगाथा ऐका. तुमच्या मनाला भावेल ती निवडा आणि आकार द्या तुमच्या स्वतःच्या अशा मननचित्राला!

तुमचे चित्र आम्हाला पाठवून या मोहिमेचा भाग बना! 

 

शिवछत्रपतींना मानवंदना देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या शिवचरित्र चित्रोत्सवामध्ये सहभागी व्हा!

Eligibility

Age: 5 to 15

siblings.png

Age: 16 and above

Rewards

For Participants

For Winners

Free 1 Year subscription of Mawala app dedicated to Chhatrapati Shivaji Maharaj

Grand prizes from Mawala

Medal and certificate from Khula Aasmaan

A Digital certificate from Khula Aasmaan

Exhibition of selected artworks

Participation fees: ₹50/-

Ramji Pangera

निर्वाणीचा प्रकाश 

वर्ष : १६७१
ही गोष्ट आहे शिवछत्रपतींच्या पंचाग्निंपैकी एक म्हणून गौरवल्या गेलेल्या एका भन्नाट स्वॉरिअरची - रामजी पांगेरा यांची!
स्वराज्यसेना मुघलांच्या बागलाण प्रांतात धुमाकूळ घालत असताना स्वराज्याच्या पायदळाचे पंचहजारी मनसबदार असलेले रामजी पांगेरा एका रात्री आपल्या काही साथीदारांना घेऊन जवळच्या कण्हेरगडावर मुक्कामाला पोहोचतात.   मुघल सरदार दिलेरखानाला याचा सुगावा लागतो. तो आपल्याकडील वीस हजाराचे सैन्य घेऊन त्यांचा पाठलाग करत कण्हेरगडाला वेढा देतो. 
शत्रु संख्या जास्त आहे म्हणून दुर्ग देऊन टाकणे वगैरे आपल्या मावळ्यांना ठाऊकच नव्हते! रामजींनी कसे आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा दिली आणि 700 जणांना घेऊन 20000 जणांच्या मुघल सैन्याला तोंड दिले याची कहाणी स्वतः रामजीच सांगत आहेत, ऐका...

Ramaji
Yesaji
Yesaji Kank

राजांचा शब्द 

वर्ष - १६७७ 
राज्याभिषेकानंतर मैत्रीचा करार करण्यासाठी म्हणून शिवराय कुतुबशहाच्या राजधानीत म्हणजे आजच्या हैदराबाद येथे पोहोचले होते. कुतुबशहाने कमालीचे आदरातिथ्य केलेले होते. 
पण "तुमच्या सैन्यात हत्ती नाहीत, आणि तुमचा एक सैनिक जर हत्तीच्या तोलाचा असेल तर करमणूक म्हणून तुमच्या एका मावळ्याला माझ्या अतिशय झुंजू देत!" असा बालिश आग्रह कुतुबशहाने धरला. राजांचा शब्द पाळण्यासाठी म्हणून आपले पायदळ प्रमुख येसाजीराव कंक कुतुबशहाच्या हत्तीची सामना करण्यासाठी निवडले गेले. मग यात कोण जिंकले आणि काय घडले स्वतः येसाजीराव सांगत आहेत तुम्हाला... ऐका.

Shivaji Kashid

खारीचा वाटा 

वर्ष - १६६०

ही एका अशा स्वॉरियरची कहाणी आहे ज्याने एका अनोख्या मोहिमेत अविश्वसनीय धैर्य आणि समर्पण दाखवले - जे त्यापूर्वी कोणीही कुठल्याही राजासाठी कधीही केले नव्हते. पन्हाळगड दुर्गाला शत्रूने अनेक महिने घट्ट वेढा दिलेला होता. आणि त्यात कसलीही ढील पडत नव्हती, त्यामुळे शिवरायांना तिथून निसटून जाण्याव्यतिरिक्त दुसरा कुठला मार्गच उरला नव्हता.  तथापि, या योजनेचे यश शत्रूला दिशाभूल करण्याच्या एका अतिशय महत्त्वाच्या कामगिरीवर अवलंबून होते. शत्रूला खात्री पटवून द्यायची होती की त्यांनी शिवरायांना पकडले आहे, जेणेकरून शिवरायांना वेढ्यातून निसटून जाणे सोपे होईल. तेव्हा समोर आले - शिवाजीराव काशिद - एक शूर स्वॉरियर ज्यांचा आणि थेट शिवरायांच्या चेहऱ्यामध्ये विलक्षण साम्य होते. दृढनिश्चयासह, त्याने स्वेच्छेने अशक्य ते साध्य केले. शिवछत्रपतींचे रूप घेऊन मीच शिवाजी म्हणत जाणूनबुजून शत्रकडून पकडले जाण्यासाठी ते पुढे आले  होते.  
ते पालखीत बसून शत्रूच्या दिशेने निघाले जेव्हा त्यांच्या मनात अभिमान, भीती आणि भक्ती अशा किती भावनांची घालमेल होत असेल बरं? चला त्यांच्याच कडून ऐकुया!

Shivaji Kashid
Adisheri.jpeg

अडिशेरी

आपल्या लोकांच्या कल्याणासाठी अढळ वचनबद्ध असलेले शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामान्य लोकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना सुरू केल्या. यापैकी एक होती अडिशेरी योजना, युद्धभूमीवर प्राण गमावलेल्या वीरांच्या कुटुंबियांना किमान उपाशी राहावे लागू नये यासाठी एक अभूतपूर्व उपक्रम. या योजनेअंतर्गत, अशा कुटुंबांना दरमहा अन्नधान्याचा एक पूर्वनिर्धारित भाग दिला जात असे, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेचे आणि कल्याणाचे रक्षण होते.

ही कथा अशाच एका कुटुंबाभोवती फिरते. स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या बांदल सेनेतील एक शूर योद्धा शिलोजीराव कदम यांच्या विधवेची ही कहाणी आहे.

एक तरुण मावळा शिलोजीरावांच्या घरी अडिशेरी देण्यासाठी आलेला आहे. शिलोजीरावांची विधवा घडलेला प्रसंग आपल्या सर्वाना ऐकवत आहे. 
ऐका....

bottom of page